vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

बँकांनी विविध महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत..

 बँकांनी विविध महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत..

सांगली प्रतिनिधी) – पीक कर्जासह अन्य शासकीय योजनांतर्गत कर्जाच्या प्राप्त प्रस्तावांवर सर्वच बँकांनी प्राधान्याने व सकारात्मक दृष्टिकोनातून अंमलबजावणी करावी. बँकांना पतपुरवठ्याचे दिलेले उद्दिष्ट त्यांनी विहित वेळेत पूर्ण करावे. बँकांनी महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या बैठकीस बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे उपव्यवस्थापक विशालकुमार सिंग, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी अक्षय गोंडेवार, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या नंदिनी घाणेकर यांच्यासह, जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक महेश पाटील, विविध शासकीय विभागांचे प्रमुख, विविध विकास महामंडळांचे व्यवस्थापक, बँकांचे समन्वयक उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे म्हणाल्या, जिल्हा वार्षिक पतपुरवठा योजना सन 2025-26 अंतर्गत जून तिमाहीसाठी सर्व क्षेत्राखालील लक्षांकाच्या 150 टक्के म्हणजेच रक्कम रुपये 9 हजार 37 कोटी वाटप झाले आहे. त्यापैकी प्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रुपये 5 हजार 557 कोटी तर अप्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रूपये 3 हजार 480 कोटी वाटप झाले आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कृषि व तत्सम क्षेत्रे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र, पीककर्ज वाटप यांसह अन्य प्राथमिक व अप्राथमिक क्षेत्रांकरिता विभागवार, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व विविध महामंडळांतर्गत पतपुरवठा योजनांतर्गत कर्जवाटपाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला..यावेळी जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी बँक ऑफ इंडिया, एच डी एफ सी, युनियन बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी बचत गटाचे वाटप चांगले केल्याने त्यांचे अभिनंदन केले व ज्या बँकांची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांनी प्रकरणे निकालात काढावीत असे सांगितले. री के वाय सी. प्रक्रियेतील प्रलंबित बाबींचा बँक वार आढावा अक्षय गोंडवार यांनी घेतला व लवकरात लवकर प्रलंबित री के वाय सी पूर्ण करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले.

 

00000

संबंधित पोस्ट

आदिम जमातीतील कुटुंबांनाही मिळणार घरे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे| हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट..

vishwatmaklokswamivarta

दुर्गम भागातील रस्त्यांबाबत तातडीने उपाययोजना-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका**विधानसभा निवडणूकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणी मतदार जनजागृती*

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

vishwatmaklokswamivarta