vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

नव्या मुंबईतील*दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करणा-या इसमांवर कारवाई*

नव्या मुंबईतील*दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करणा-या इसमांवर कारवाई*

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रात रस्त्यांवर 35 हजारहून अधिक दिवाबत्तीचे खांब बसविण्यात आले असून त्यामध्ये वाशी लिंक रोड तसेच ठाणे बेलापूर महामार्गावरील दिवाबत्तीच्या खांबामधील तांब्याची तार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत वाशी पोलीस ठाण्यात 10 दिवसापूर्वी एनसी तक्रारही नोंदविण्यात आली होती. महापालिका विद्युत विभागाच्या वतीने दिवाबत्तीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विभागवार एजन्सीजची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत दिवसातून दोन ते तीन वेळा दिवाबत्तीच्या खांबांची एजन्सीच्या कामगारांकडून पाहणी करण्यात येत असते.

   यामध्ये सायन पनवेल महामार्गावर वाशी टोलनाक्यापुढे वाशी गावाजवळचा भाग तसेच बेलापूर उड्डाणपूलाजवळील भाग तसेच ठाणे बेलापूर मार्गावरील काही भाग येथील दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरीला गेल्याची बाब नमुंमपा विद्युत विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या भागात अधिक सतर्कता बाळगण्यात आली.

यामध्ये 27 ऑक्टोबर रोजी सायं. 5.30 च्या सुमारास ठाणे बेलापूर रोड वरील कोकीलाबेन हॉस्पिटलजवळ दुभाजकामधील दिवाबत्तीच्या खांबांवरील तांब्याची तार दोन इसम काढत असल्याचे या भागातील दिवाबत्तीची देखभाल व दुरुस्ती करणा-या मे. चैतन्य इलेक्ट्रिकल या एजन्सीच्या कामगारांच्या निदर्शनास आले. या चोरी करणा-या माणसांमधील एक व्यक्ती पळून गेला व एका व्यक्तीस चोरी केलेल्या 48 मीटर तांब्याच्या तारेसह ताब्यात घेण्यात आले. त्याची रितसर एफआयआर तक्रार मे. चैतन्य इलेक्ट्रिकल यांच्यामार्फत तुर्भे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे.

एका दिवाबत्तीच्या खांबामध्ये साधारणत: 48 मीटर लांब तांब्याची तार वापरली जाते. अशाप्रकारच्या 60 दिवाबत्ती खांबांमधील साधारणत: 2880 मीटर लांबीची तार चोरीला गेल्याचे पाहणीअंती निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या चोरीमुळे या भागातील दिवाबत्तीवर परिणाम होत असून पथदिवे सुरु नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. विशेषत्वाने बेलापूर उड्डाणपूलाखालील बसस्टॉप तसेच वाशी गावाजवळील बसस्टॉप येथून जास्त प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे दिवाबत्ती सुरू नसल्याने या भागात काळोख झाल्याने रहदारीला अडचण होऊन अपघाताचा धोका संभवतो तसेच अनुचित प्रकार घडण्याची संभाव्य शक्यताही व्यक्त केली जात होती.

 त्या अनुषंगाने या बाबीकडे गांभिर्याने लक्ष देत शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड व कार्यकारी अभियंता श्री. प्रविण गाडे यांच्या नियंत्रणाखाली महापालिका विद्युत अभियंते व देखभाल दुरुस्ती करणा-या एजन्सीचे कर्मचारी यांचेमार्फत अधिक काटेकोरपणे दक्षता घेण्यात आली. यामुळे दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करतांना पकडलेल्या व्यक्तीस तुर्भे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.

या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे महानगरपालिकेच्या अधिकृत एजन्सीमधील कामगारांव्यतिरिक्त कुणी अपरिचीत व्यक्ती दिवाबत्तीच्या खांबानजिक काही कृत्य करतांना दिसल्यास कृपया 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन सहकार्य करावे.

संबंधित पोस्ट

अमेरिका आणि इंग्लंडकडून लाल समुद्रातील हल्ल्यांना प्रत्युत्तर, येमेनमध्ये इराण समर्थित हौती गटावर मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी

55 कोटी रुपयांचा घोटाळा,खासदार भावना गवळी यांच्या बालाजी सहकार कारखाना विरोधात केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार केली सीबीआय व ईडी मार्फत चौकशीची मागणी वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! / दीपावली की हार्दिक शुभकामनाएं !

vishwatmaklokswamivarta

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

भाजपा आमदार: नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी

vishwatmaklokswamivarta