vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना #गॅसपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन अडचण येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी बैठकीत व्यक्त केली.

सध्यस्थितीत पुण्यात सुरू असलेल्या विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना #एलपीजी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी स्वीडन, जपान आणि दक्षिण कोरियाचे महावाणिज्य दूत यांच्या विनंतीवरून सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत स्वीडनचे महावाणिज्य दूत आणि डीन ऑफ द कॉन्सुलर कॉर्प्स स्वेन ऑस्टबर्ग, जपानचे महावाणिज्यदूत कोजी यागी आणि दक्षिण कोरियाचे महावाणिज्यदूत डोंगवान यू, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ.राजेश गवांदे, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे, राज्यातील तेल कंपन्यांचे समन्वयक उमेश कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुंबईत पोलिसांकडून कबुतर प्रेमींवर कठोर कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामधून 11 वर्षात साध्य झालेल्या प्रगतीचा आराखडा, वर्तमानकाळाचे सामर्थ्य आणि समृध्द भारतासाठी आखलेले धोरण स्पष्‍ट – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

हिंदू जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी-हिंदु जनजागृती समितीची मागणी-महाकुंभच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा – सनातनी हिंदूंच्या श्रद्धेला जाणीवपूर्वक आघात करण्याचा प्रयत्न !

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय