vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

 सांगली, द प्रतिनिधी : जत येथे 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल. जत तालुक्यातील देवस्थानांचा विकास आणि प्रत्येक गावात पायाभूत सुविधा तसेच विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिली.

 जत येथे पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, जतचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, जत पंचायत समिती सभापती अर्चना पाटील, उपसभापती रविकुमार बगली, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, तहसीलदार प्रवीण धानोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता कुंडलिक उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचरसाठी आणखी निधी लागल्यास तो उपलब्ध करून देऊन सर्व व्यवस्था उपलब्ध करून देऊ. या इमारतीमुळे सामान्य नागरिकांना सुविधा मिळून प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही काम करणे सोयीचे होणार आहे. जत तालुक्यात पहिल्याच टप्प्यात 8 देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या प्रत्येक देवस्थानच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये याप्रमाणे एकूण ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

 जत तालुक्यात मागील वर्षात 22 ग्रामपंचायत इमारती मंजूर करण्यात आल्याचे सांगून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जत तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या जाळ्यासाठी एकूण ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, यामुळे दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. ज्या गावात स्मशानभूमी नाही त्यासाठीही आवश्यक निधी दिला जाईल. यासाठी प्रस्ताव सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी जत तालुक्यात करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची स्तुती केली.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ग्रामीण भागातील प्रशासकीय सुविधा मजबूत करण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली असून पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे अधिकारी व नागरिक दोघांनाही सुविधा मिळतील. जतच्या सौंदर्यात भर पडणारी ही इमारत येत्या काही महिन्यात भव्य दिव्य स्वरूपात पहावयास मिळणार आहे. गोरगरीबांना घरकुल व सोलर पॅनेल, क्रीडांगण विकास, प्राणी संग्रहालय, मंदिरांचा विकास, जिल्हा परिषद शाळा दुरूस्ती व सोयी सुविधा, बेरोजगारांना प्रशिक्षण, शेतीसाठी व पिण्यासाठी स्वच्छ पाणी आदि कामे शासनाच्या माध्यमातून पूर्ण करून या भागाचा कायापालट करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 यावेळी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जत पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा रामपूरच्या विद्यार्थिनीनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  यावेळी आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बांधकाम कामगार लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात साहित्य वाटप करण्यात आले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांनी केले. आभार पंचायत समिती सदस्‍य विजय रूपनर यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी- मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान …

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा घेतला आढावा- पूरबाधित गावांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करूया- नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना…

धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त*विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम*36 स्टॉलवर शासकीय विभागांची माहिती….

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्कØ वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

रत्नागिरीत आरे-वारे समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू तर पंढरपुरात चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या

vishwatmaklokswamivarta