vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विशेष मुलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विशेष मुलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

       नवी मुंबई प्रतिनिधी   नमुंमपा ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मतिमंद, कर्णबधीर, स्वमग्न, अंध, अध्ययन अक्षम आणि बहुविकलांग मुले शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधांचा लाभ घेत असतात. ईटीसी केंद्रामार्फत या विशेष मुलांसाठी शिक्षण व विविध थेअरपीसोबत इतरही अनेक उपक्रम राबवले जातात. या नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विशेष मुलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

          राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम [RBSK] अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व शाळा अंगणवाडी यांमध्ये शिक्षण घेणा-या सर्व मुलांचे आरोग्य तपासणी करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून नमुंमपा ईटीसी केंद्रातील विशेष मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये दैनंदिन आरोग्य, हवामानानुसार होणारे आजार या अनुषंगाने मुलांची तपासणी करण्यात आली.

  •           यतपासणीकरिता डॉ. अशोक चव्हाण, डॉ. सुस्मिता व्हटकर, डॉ. रणजीत शिर्के, डॉ. भाग्यश्री भोकरे, डॉ. तेजस्विनी जाधव, डॉ. प्रतिभा मुंडे, डॉ. विजय पाटील, डॉ. निखील केसरे या डॉक्टरांसह इतर आरोग्य समुहाने विशेष मुलांची तपासणी केली व गरजेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले.

  • या आरोग्य शिबीरामध्ये कर्णबधिर विभागातील 114, मतिमंद विभागातील 108, बहुविकलांग विभागातील 11 आणि अंध विभागातील 19 तसेच ओपीडी विभागातील 25 अशा एकूण 277 विशेष मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

           महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य तपासणी शिबीर अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांच्या प्रोत्साहनानुसार आयोजित करण्यात आले. ईटीसी केंद्राच्या संचालिका डॉ.अनुराधा बाबर यांनीही या आरोग्य शिबीराच्या सुयोग्य आयोजनामध्ये स्वत: लक्ष दिले. शिबीराच्या आयोजनात केंद्राच्या अधीक्षक आणि मतिमंद विभाग व कर्णबधीर विभाग यांच्या शैक्षणिक व्यवस्थापकांनी विशेष योगदान दिले.

 

संबंधित पोस्ट

१ डिसेंबर : ३७ वा जागतिक एड्स दिन — अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यात १७७३ रुग्णांना सुमारे १३.६९ कोटीची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

कर्करोग तपासणी, जनजागृती मोहीम वेळोवेळी राबवा- जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हाधिकारी कार्यालयात मौखिक कर्करोग जनजागृती अभियान

सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाचा नवी मुंबईत उत्साहात प्रारंभ

कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

मलेरिया निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सज्ज; जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न*

vishwatmaklokswamivarta