vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*

*रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*

लातूर प्रतिनिधी-रेणा नदीवरील रेणापूर, जवळगा, बंधारा येथील पाणी पातळी पूर्ण संचय पातळीला आहे व सद्यस्थितीत बांधा-यामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रेणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांनी सतर्क राहून विशेष खबरदारी घ्यावी, नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच आपल्या मालमत्तेची आणि जनावरांची काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जावू नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जावू नये. पाऊस सुरु असतांना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

गुंठेवारी मालमत्ताना पन्नास टक्के सुट व सवलत देऊन नियमित करून देण्यात यावी,औरंगाबाद शहर सुधार समितीच्या वतीने मनपा आयुक्त सचिवला निवेदन.

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

सरपंच ग्रामविकासाचे दूत – रोहयो मंत्री भरत गोगावले

दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी ठाण्यात विशेष तपासणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

पासपोर्ट अर्जदारांसाठी संवाद सत्र-प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे

vishwatmaklokswamivarta

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे- संचालक हेमराज बागुल