vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

विदेश प्रतिनिधी- भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सुरू झाले  हिंसक आंदोलन: सोशल मीडियावरील बॅनविरोधात नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनामुळे देशात सत्तांतर होण्याची चिन्हं आहेत. शेजारील देशात सुरु असलेल्या आंदोलनानं ओली सरकार संकटात सापडलं आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीदेखील नुकताच राजीनामा दिला आहे. सरकारनं कालच सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही तरुणाईचा रोष कमी झालेला नाही. आंदोलनाची धग देशभरात जाणवू लागली आहे.

नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी देश सोडून दुबईला पळून गेल्याचे सूत्रांची माहिती  . सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय उपचारांच्या बहाण्यानं ते दुबईला जाऊ शकतात. अशी चर्चा होती परंतु नेपाळमधील खासगी विमान कंपनी असलेल्या हिमालय एअरलाइन्सचं विमान स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी  देश सोडला असल्याचे सांगण्यात येत आहे . सध्याच्या घडीला जेन झीचं आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. या आंदोलनानं देशात क्रांती घडू शकते. नवीन चेहरा पंतप्रधानाचा समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

यावेळी मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये सुरु असलेलं तरुणाईचं आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चाललं आहे. तरुणांनी संसदेत घुसून दोन्ही सदनांना आग लावली. सध्याच्या घडीला संपूर्ण संसद आंदोलकांच्या ताब्यात आहे. दुसरीकडे संपूर्ण देशात राजीनामांचा सिलसिला सुरु झाला आहे. आंदोलकांचा धसका घेत मधेश प्रदेशचे मुख्यमंत्री सतीश सिंह यांनी राजीनामा दिला आहे. यासोबतच लुंबिनी, गंडकी, सुदूर पश्चिम प्रदेशसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांनी राजीनामे दिले आहेत. राजधानी काठमांडूसह अनेक राज्यांमध्ये आंदोलनं सुरु आहेत. जाळपोळ, दगडफेक यांच्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. हिंसाचाराच्या घटना वाढत असल्यानं राजकीय संकट निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत आहे

संबंधित पोस्ट

संरक्षण मंत्र्यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबत दूरध्वनीवरुन चर्चा, वाढत्या औद्योगिक सहकार्यावर भर देत संरक्षण संबंध वाढविण्याबाबत चर्चा

सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेकजणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त.,परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रभावितांना पूर्ण सहकार्य करण्याचे म्हणाले

vishwatmaklokswamivarta

भारतीय अंतराळवीर गट कॅप्टन शुभांशूशुक्ला आणि अ‍ॅक्सिओम४ मोहिमेतील इतर तीन क्रू सदस्यांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू होईल.

vishwatmaklokswamivarta

३ जून २०२६ पासून जर्मनीमार्गे हवाई प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ट्रान्झिट व्हिसाची अट रद्द .

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संरक्षण धोरण विषयक चर्चेचे 10 वे सत्र नवी दिल्लीत संपन्न

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिक भूमी…

vishwatmaklokswamivarta