vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नागरिकांना कालमर्यादेत सेवा द्यावी  – उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल

आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नागरिकांना कालमर्यादेत सेवा द्यावी  – उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल

जालना, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सद्यस्थितीत जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी विहीत कालमर्यादेत नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार केंद्र चालकांच्या आयोजित दुरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिले.

 दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस नायब तहसीलदार राजू निहाळ, जिल्हा प्रकल्प प्रमुख प्रल्हाद तारख, अभियंता सुर्यकांत मगर, जिल्हा समन्वयक मंगेश जाधव यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल म्हणाले की, सर्व केंद्रचालकांनी आपले सरकार सेवा केंद्र हे शासनाने नेमुन दिलेल्या जागेवर चालवावेत. केंद्र इतरत्र चालवत असल्याचे निर्देशनास आल्यास संबंधित केंद्र चालकावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांचे अर्ज ऑनलाईन करतांना सर्व केंद्रचालकांनी नागरिकांचाच मोबाईल नंबर टाकणे अनिवार्य आहे. अर्जदार यांना त्यांचे अर्जाच्या स्थितीची माहिती एसएमएस व व्हॉटसअपद्वारे त्वरित उपलब्ध करून द्यावी. तसेच त्यांचे प्रमाणपत्र अर्जदार यांना त्यांचे व्हॉटसॲपवर उपलब्ध करून द्यावे. कोणीही प्रिंट काढून देणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. सर्व केंद्रचालकांनी केंद्रावर शासनाने दिलेल्या स्टँडर्ड नमुन्यातच केंद्राच्या दर्शनी भागातील बॅनर व दरपत्रक लावावे. जे केंद्रचालक आपले केंद्रावर शासनाचे दरपत्रक व सेवाविषयक बाबींचा तपशिल लावणार नाही. त्यांचे केंद्र बंद करण्यात येईल. सर्व सेवांची यादी, शुल्क व अपेक्षित कालावधी स्पष्टपणे फलकावर लावावा. कुणीही एजंटकडून व्हाटसअपवर डॉक्युमेंट मागवून फाईल ऑनलाईन करू नयेत. खोटी डॉक्युमेंट अपलोड करू नये. अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधित केंद्र चालकाचे केंद्र तात्काळ रद्द करण्यात येवून, फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी सर्व व्यवहार कॅशलेश, ऑनलाईन पेमेंटचे प्राधान्याने करावेत. जेणेकरून पारदर्शकता आणता येईल. सर्व सेवांसाठी ठराविक शुल्कापेक्षा अधिक आकारणी होऊ नये. अशी बाब निर्देशनास आल्यावर संबंधित केंद्र चालकावर कारवाई करण्यात येईल. दोन प्रकारचे क्युआर कोड असून, एक विविध प्रमाणपत्राकरीता व एक नागरिकांच्या ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी आहे. सदर दोन्ही क्युआर कोडची प्रिंट सर्वांनी केंद्राच्या दर्शनीय भागावर लावावी. जेणेकरून नागरिकांस ऑनलाईन तक्रार करता येईल. सर्व केंद्रचालकांनी प्रतिक्रिया नोंदवही ठेवावी. तसेच त्यांनी दिलेल्या सेवाबाबतचा तपशिल नोंदवहीत ठेवणे अनिवार्य आहे. जेणेकरून शासनाचे तपासणीवेळी सदर नोंदवहीनुसार आपण दिलेल्या सेवांबाबत पडताळणी करणे सुलभ होईल. जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये मुलभूत सुविधा स्थापित कराव्यात. प्रत्येक केंद्रात सीसीटिव्ही कॅमेरे बसवून पारदर्शकता वाढविण्याबाबत निर्देशही देण्यात आले. यावेळी जिल्‌ह्यातील सर्व आपले सेवा केंद्रचालक ऑनलाईन उपस्थित होते.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात 

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी  आरक्षण जाहीर

vishwatmaklokswamivarta

अभिजात मराठी भाषा सप्ताहात नवी मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांनी घेतले शुध्दलेखनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नियोजन भवन येथे जलसंधारणासह विविध विकास कामांचा आढावा

कोकण विभागातील उपधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी इप्सित, प्रत्यय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर आयोजित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न…