पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राज्य प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली तसंच नुकसानग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर देत आश्वस्त केलं.
पावसामुळे जे जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई दिली जाईल तसंच टंचाईच्यावेळी ज्या सवलती दिल्या जातात त्या नुकसानग्रस्तांना दिल्या जातील.
केंद्र सरकारही मदत करणार आहे, राज्यासाठी केंद्र सरकार एनडीआरएफसाठी पैसे राखीव ठेवते ते अग्रीम पैसे खर्च करायला सुरुवात केली आहे, जो निधी लागेल तितका दिला जाईल, मदतीसाठी निधीची कमतरता भासणार नाही – मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
दरम्यान त्यांनी यावेळी पत्रकारांना माहिती देत असताना म्हणाले की येत्या दहा दिवसात मदत देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली