vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी): राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत सन 2025-26 मध्ये रब्बी हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व पौष्टीक तृणधान्य पिकांच्या प्रमाणित बियाणे वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वेळेत अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाचे तंत्र अधिकारी अजय वाढे यांनी केले आहे..

या योजनेअंतर्गत हरभरा आणि ज्वारी पिकांसाठी बियाणे अनुदान दर निश्चित करण्यात आले आहेत. हरभरा 10 वर्षांआतील वाणाकरिता 2073.4 क्विंटल बियाण्यांचे वितरण 50 रुपये प्रति किलो अनुदान दराने करण्यात येणार आहे. तर 10 वर्षांवरील वाणाकरिता 25 रुपये प्रति किलो अनुदान असेल. तसेच ज्वारी 10 वर्षांआतील वाणाकरिता 40 क्विंटल बियाणे 30 रुपये प्रति किलो अनुदान दराने, आणि 10 वर्षांवरील वाणाकरिता 170 क्विंटल बियाणे 15 रुपये प्रति किलो अनुदान दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बियाणे वितरण ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्वावर करण्यात येईल. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व कृभको या संस्थांच्या अधिकृत वितरकांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार आहेत. शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, सातबारा उतारा व आधार कार्ड असणे आवश्यक असून, एका शेतकऱ्याला केवळ 1 हेक्टर मर्यादेतच प्रमाणित बियाण्याचा लाभ देण्यात येईल.

000000

संबंधित पोस्ट

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातूनशालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान….राज्य श्रेणीत महाराष्ट्र तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगर पालिका सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित.

vishwatmaklokswamivarta

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील*दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करणा-या इसमांवर कारवाई*

vishwatmaklokswamivarta

उच्च न्यायालयात सिंहगडएक्स्प्रेसच्या थांब्यासाठी-अशी मागणी पुणे प्रवासी संघाने केली

रस्ते सुरक्षा अभियान विशेष लेख-

vishwatmaklokswamivarta