vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी): राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत सन 2025-26 मध्ये रब्बी हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व पौष्टीक तृणधान्य पिकांच्या प्रमाणित बियाणे वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वेळेत अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाचे तंत्र अधिकारी अजय वाढे यांनी केले आहे..

या योजनेअंतर्गत हरभरा आणि ज्वारी पिकांसाठी बियाणे अनुदान दर निश्चित करण्यात आले आहेत. हरभरा 10 वर्षांआतील वाणाकरिता 2073.4 क्विंटल बियाण्यांचे वितरण 50 रुपये प्रति किलो अनुदान दराने करण्यात येणार आहे. तर 10 वर्षांवरील वाणाकरिता 25 रुपये प्रति किलो अनुदान असेल. तसेच ज्वारी 10 वर्षांआतील वाणाकरिता 40 क्विंटल बियाणे 30 रुपये प्रति किलो अनुदान दराने, आणि 10 वर्षांवरील वाणाकरिता 170 क्विंटल बियाणे 15 रुपये प्रति किलो अनुदान दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बियाणे वितरण ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्वावर करण्यात येईल. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व कृभको या संस्थांच्या अधिकृत वितरकांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार आहेत. शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, सातबारा उतारा व आधार कार्ड असणे आवश्यक असून, एका शेतकऱ्याला केवळ 1 हेक्टर मर्यादेतच प्रमाणित बियाण्याचा लाभ देण्यात येईल.

000000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देत 6 हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन.चैत्यभूमी येथेही ज्ञानस्मारकाची माहिती देणारा स्टॉलचैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रमाची ज्ञानस्मारकात थेट प्रक्षेपण व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्लासेससाठी आदेश निर्गमित सकाळ-सायंकाळच्या सत्रात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस घ्यावेत..

महाराजस्व अभियानात नागरिकांनी विविध योजनाचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.सातबारा विलगीकरण करून ६८ सातबारा प्रमाणपत्र वितरण

सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन..