vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा• जिल्हाधिकारी अशोक काकडे -जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण बैठकीत सूचना

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा• जिल्हाधिकारी अशोक काकडे -जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण बैठकीत सूचना

            सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाची 21 वसतिगृहे आहेत. यामध्ये 1 हजार 364 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहे व निवासी शाळांतील उर्वरित रिक्त जागा शंभर टक्के भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आणि के. पी. मुधाळे, जिल्ह्यातील वसतिगृहांचे अधीक्षक आदि उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा व वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवावी. या रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करावे. याबाबतचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. तसेच, सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करून घ्यावे. तसेच, प्रवेशित विद्यार्थ्यांना आपत्कालिन व्यवस्थापनाचे धडे द्यावेत, असे त्यांनी सूचित केले.

या बैठकीत शासकीय वसतिगृहातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रवेशस्थिती, शासकीय इमारत बांधकाम व दुरूस्ती, वसतिगृह बांधकामासाठी जमीन प्राप्त असलेल्या परंतु अद्याप इमारत बांधकाम सुरू न झालेली वसतिगृहे, सामाजिक न्याय भवन, सांगली येथील इमारतीच्या डोम दुरूस्ती, वसतिगृहातील सोयी सुविधा, वसतिगृह प्रवेशितांची आरोग्य तपासणी, मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

संयम, संपर्क, समन्वयाने गणेशोत्सव साजरा करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन;• पुनर्वसनाला प्राधान्य देत २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश

राज्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा  इशारा; अनेक भागात गारपीट ..

शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करावी सभापती प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देशकामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाईचे निर्देश..

राष्ट्रीय विधी सेवा दिन, बालदिन व तंबाखूमुक्त युवा अभियान रॅली अलिबागमध्ये उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन