vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी): जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडुन त्यांच्या शेतांमध्ये विविध प्रयोग करतात. त्यांच्या या प्रयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी रब्बी हंगाम 2025 पीक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एम.डी. ढगे यांनी केले आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि इतर शेतकऱ्यांनाही त्यातून मार्गदर्शन मिळेल असा या योजनेचा उद्देश आहे. दिनांक 20 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार रब्बी हंगाम 2025 मध्ये बुलढाणा जिल्ह्याकरीता ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पात्रता : स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थी शेतकरी स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली जवळपास अर्धा हेक्टर जमीन (40 आर) क्षेत्रावर सलग लागवड करणे आवश्यक आहे. पिक स्पर्धेसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील ते सर्व शेतकरी पिक स्पर्धेकरिता पात्र राहतील. पिक स्पर्धामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्ष त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.

 

सर्वसाधारण गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क आहे. पिकस्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सातबारा व 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)या कागदपत्राची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  सरपंचाने दिले एका वर्षाचे मानधन…

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे    –विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम,नागरिकांसाठी उपयुक् -जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुंबई उपनगर जिल्ह्यात मोहिमेस उत्साहात सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी, लावण्यासाठी सस्ती अदालत उपक्रम राबविणार- विभागीय आयुक्त दिलीप गावडे*“संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्तांचा थेट शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद**शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबत आठही जिल्हयातील शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी*Ø *तालुका पातळीवर दर पंधरवाड्याला सस्ती अदालत घेण्याचे निर्देश *

vishwatmaklokswamivarta

जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी !

ठाणे जिल्ह्यात समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यरत १०० कंत्राटी विषय शिक्षकांना कायम नेमणुकीचे आदेश,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आदेश वितरित…

vishwatmaklokswamivarta