vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट

राज्य प्रतिनिधी-📍 नागपूर उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. सेंटर पाईंट हॉटेल येथे सामाजिक न्याय विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संवाद – देशाच्या भविष्याशी या कार्यक्रमात ते बोलत होते.

वसतिगृहात नवीन २५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी नवी योजना आणण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थी घडविणे सामाजिक न्याय विभागाचे काम असून केंद्रस्थानी विद्यार्थी राहील यावर विभागाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी मंत्री शिरसाट यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा तसेच इतर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर मंगळवार, दिनांक 18 मार्च) रात्री पृथ्वीवर परतणार..

कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार– कृषिमंत्री कोकाटे

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित

कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढविण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पुढील १०० दिवसांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही याची दखल घेऊन फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन*