vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन  

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन

        जालना, प्रतिनिधी:- शासनाकडून बालविवाह मुक्त भारत पोर्टल सुरु करण्यात आले असून हे सर्व नागरिकांसाठी खुले आहे. तरी बालविवाह मुक्त भारत पोर्टलवर जाऊन https://stopchildmarriage.wcd.gov.in या लिंकवर क्लिक करुन बालविवाह निर्मुलनाची प्रतिज्ञा घ्यावी व प्रतिज्ञा घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन या मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. यांनी केले आहे.

जिल्ह्यात दि.16 ऑक्टोबर 2025 ते दि.26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान 100 दिवस जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडुन राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात बालविवाहाचे समुळ उच्चाटन व्हावे या अनुषंगाने प्रशासनाकडुन जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह थांबविण्याकरीता 24 तास 1098 ही चाईल्ड हेल्पलाईन सेवा सुरु आहे. तसेच प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकांनी देखील बालक, बालिका यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य तसेच बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बाल विवाह होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्व स्तरावरुन सर्वांनी बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणुन बालविवाह मुक्त भारत पोर्टल सुरु करण्यात आले आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

छत्तीसगड च्या चक्रधर महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख अतिथी ..

vishwatmaklokswamivarta

जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा,ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करतांना जागरुकता बाळगावी- अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार

जैन समाजाची सेवा, त्याग व अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन ६४ वा जैन दीक्षा समारंभ

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन..

टी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ! – सुराज्य अभियानाचे नागपूर व गोवा येथील तक्रारींना समर्थन*

रेल्वे स्टेशन वरील चहा विक्रेत्यांवर वैधमापन शास्त्र विभागाची कारवाई