vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु

 

जालना, प्रतिनिधी- इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांना दि.25 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत.

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शहरात उच्च शिक्षणासाठी निवासाची सोय उपलब्ध करून देणे हा आहे. जालना महापालिका हद्दीपासून 10 कि.मी. अंतराच्या परिसरातील महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा तर इतर तालुक्याच्या ठिकाणावरील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांसारख्या पर्यायी योजनेसाठी अर्ज करावेत. असे आवाहन, सहायक लेखाधिकारी, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात…बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदानाची नोंद झाली आहे.

vishwatmaklokswamivarta

पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

येत्या रविवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन 

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 पीक स्पर्धेमध्ये ज्वारी, बाजरी व सोयाबीन पिकामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले

सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती !*हिंदूंच्या प्रथा-परंपरा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कठोर कारवाई करेल* *मंदिरे आणि गडकिल्ले यांवरील मंदिरांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रसंगी ‘बुलडोझर’ कारवाई !**मंदिरांच्या सर्व समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू ! -* भरतशेठ गोगावले, फलोत्पादन आणि रोजगार हमीमंत्री

vishwatmaklokswamivarta