vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध;25 जूनपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध;25 जूनपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

     अमरावती, प्रतिनिधी): अमरावती जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण आज, 19 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे रीतसर मुनादी (दवंडी) देऊन हे प्रारूप आरक्षण नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. या प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणामध्ये जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील 44, वरूड 43, दर्यापूर 49, अंजनगाव सुर्जी 34, अमरावती 46, भातकुली 36, नांदगाव खंडेश्वर 51, चांदुर रेल्वे 30, धामणगाव रेल्वे 55, तिवसा 30, मोर्शी 39 आणि चांदुर बाजार तालुक्यातील 41 अशा एकूण 498 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा तपशील समाविष्ट आहे. दरम्यान, हे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या नागरिकांना यावर काही आक्षेप किंवा हरकती घ्यायच्या असतील, त्यांच्यासाठी 25 जून 2026 ही अंतिम तारीख असणार आहे. शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयात हे आक्षेप स्वीकारले जातील, तरी इच्छुकांनी विहित मुदतीत आपले आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर येथे दिनांक 8 डिसेंबरपासून सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून तातडीने मदत करावी ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ-समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यात तीन महिन्यात 90.77 कोटींची वसुली…

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गिरगाव चौपाटीवर प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहिम एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा- प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संकल्प: ‘सेवा पंधरवडा’**सेवा परमो धर्म: जनतेची कामे आता वेगवान..!*

vishwatmaklokswamivarta