vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

खरीप व रब्बी हंगामासाठी शेतमालाला हमीभाव निश्चित;शेतमाल तारण योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा..

खरीप व रब्बी हंगामासाठी शेतमालाला हमीभाव निश्चित;शेतमाल तारण योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा..

 

बुलडाणा, प्रतिनिधी: शासनाने सन 2024-25 मधील खरीप व रब्बी हंगामासाठी शेतमालाला हमीभाव निश्चित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपला उत्पादीत केलेला माल नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करावा. तसेच शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना सुरु केली असून पिकांना योग्य भाव मिळेपर्यंत उत्पादीत माल गोदामात ठेवण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणास मदत होणार असून या योजनाचा लाभ शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

गहू 2 हजार 275 रुपये, ज्वारी(हायब्रीड-मालदांडी) 3 हजार 371-3 हजार 421 रुपये , सोयाबीन 4 हजार 892 रुपये, मका 2 हजार 275 रुपये, तुर 7 हजार 550 रुपये, मुग 8 हजार 682 रुपये, उडीद 7 हजार 400 रुपये, चना 5 हजार 440 रुपये शासनाने हमीभाव निश्चित केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला शासनाने घोषित केलेल्या हमीभाव व बाजारभावाप्रमाणे नजीकच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करावा. कृषि उत्पन्न बाजार समितीबाहेर खाजगी व्यापाऱ्यांना विक्री केल्यास फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल काढणी हंगामात त्यांच्या आर्थीक निकडीमुळे त्वरीत विक्रीसाठी बाजार आणतात. त्यामुळे विक्रीसाठी एकाचवेळी बाजारपेठेत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होते व परिणामी बाजारभाव कमी होवुन शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान होते. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा शेतमालाची काही काळासाठी साठवणूक करुन बाजारभाव चांगले असतांना साठवणुकीतील शेतमाल टप्याटप्याने विक्री केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना असणारी आर्थीक निकड पूर्ण होऊन त्यांच्या शेतीमालासाठी रास्त भाव मिळावा या दृ‌ष्टिकोनातुन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे यांचे मार्फत शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या अथवा वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेल्या शेतमालाच्या पावतीवर शेतमालाच्या बाजारभावानुसार रकमेच्या 75 टक्के पर्यंत रक्कम शेतकऱ्यांना 180 दिवसांच्या मुदतीकरीता द.सा.द.शे.6 टक्के व्याजाने तारण कर्ज बाजार समितीकडुन त्वरीत देण्यात येते. शेतमाल तारण कर्ज योजनेत तुर, मुग, उडीद, सोयाबीन, मका, ज्वारी, गहु, हळद, भात (धान), करडई, बाजरी, राजमा, बेदाणा, काजु बी व सुपारी या पिकांचा समावेश आहे. सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. 000000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

पाकिस्तानचा सतत सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसाय चालकांसाठी अन्न सुरक्षा मार्गदर्शक सूचना;सूचनांचे काटेकोर पालन करा-अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास भेट ; विविध विभागांच्या कामकाजाची केली पाहणी

सांगली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेसाठी57 हजारांहून अधिक खात्याची माहिती अपलोड- जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण

सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती !*हिंदूंच्या प्रथा-परंपरा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कठोर कारवाई करेल* *मंदिरे आणि गडकिल्ले यांवरील मंदिरांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रसंगी ‘बुलडोझर’ कारवाई !**मंदिरांच्या सर्व समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू ! -* भरतशेठ गोगावले, फलोत्पादन आणि रोजगार हमीमंत्री

vishwatmaklokswamivarta