vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी,दिली शहापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेट..

अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी,दिली शहापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेट..

ठाणे, प्रतिनिधी:- अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी आज शहापूर तालुक्यातील तहसिलदार कार्यालय, तलाठी कार्यालय, ॲग्रीस्टॅक शिबिर, आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा इत्यादी ठिकाणी भेटी देवून तेथील आढावा घेतला.

या दौऱ्यात त्यांनी तहसिलदार कार्यालयाला भेट देवून शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने कार्यालय परिसराची पाहणी केली व बैठक घेवून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच त्यांनी वाशिंद तलाठी कार्यालय व मंडळ कार्यालय येथे दप्तर तपासणी केली व वाशिंद येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत हितगुज केला. त्याचप्रमाणे वाशिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देवून तेथील ओपीडी, लॅबला भेट देवून तेथील कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे यांनी दहागाव येथील ॲग्रीस्टॅक शिबिराला भेट देवून शेतकऱ्यांसोबत त्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला, त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या कृतीने प्रभावित होवून शेतकऱ्यांनी त्यांना फळभाज्या भेट म्हणून दिल्या.

यावेळी शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुळे, तलाठी, मंडळ अधिकारी, वाशिंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा-सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश..

शेगावच्या आनंद सागर बाबत मोठी बातमी…कोट्यवधी रुपयांच्या इमारती, रेल्वे ट्रॅक, ढोलपुरी गेट तोडले !देणगीतून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा,धर्मादाय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश३ महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीग्रस्त मदतीचे जिल्ह्यात ६७ कोटी ४३ लक्ष रुपयांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांचा विचार ढणढनत ठेवायचा असेल तर चुल्हीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतिल…आ सिद्धार्थ खरात

भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे