vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधान परिषद लक्षवेधी-सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत अंतिम अहवालानंतर दोषींवर कारवाई- गृह राज्यमंत्री पंकज भोयर

विधान परिषद लक्षवेधी-सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत अंतिम अहवालानंतर दोषींवर कारवाई- गृह राज्यमंत्री पंकज भोयर

 

मुंबई, प्रतिनिधी:- परभणी येथील घटनेत अटक करण्यात आलेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. वैद्यकीय पथकाच्या अंतिम निष्कर्षानंतर यासाठी दोषी असलेल्यांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या निवेदनानुसार त्यांच्या मुलाला नोकरी देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

परभणीच्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सदस्य भाई जगताप यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी, डॉ.प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.

गृहराज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, परभणी येथे प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून 43 जणांना अटक करण्यात आली. या घटनेत अटक करण्यात आलेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचे 16 डिसेंबर 2024 रोजी शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात हिस्टोपॅथॉलॉजी परीक्षण अहवालानंतर मृत्यूचे अंतिम कारण निश्चित करुन अंतिम अहवाल देणार असल्याचे नमूद करण्यात आले असून हा अहवाल आल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे डॉ.भोयर यांनी सांगितले.

या प्रकरणाची सीआयडी मार्फत तसेच न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीमार्फत सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी यावेळी दिली.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत,भुयारी मार्गानजीक असलेल्या रस्त्यांसाठी २१ कोटींची तरतूद,गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार,मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती..

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान**नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’; वृक्षारोपण केलेले १७,००० वृक्ष ‘बेपत्ता’!

कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात आज  सदिच्छा भेट घेतली.

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रात्यक्षिक संपन्न…

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस…