vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

 

     नवी मुंबई प्रतिनिधी  -नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘गट-क’ आणि ‘गट – ड’ मध्ये 30 संवर्गात 620 पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची माहिती वर्तमानपत्रांतून तसेच महानगरपालिकेची वेबसाईट व सर्व सोशल मिडिया माध्यमांतून प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

   तथापि मागील आठवड्यात महानगरपालिकेचे बोधचिन्ह असलेले खोटे लेटरहेड व खोटा शिक्का वापरून काहीजणांना नियुक्तीपत्र दिली असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस विभागाकडे रितसर तक्रार दाखल करून अशा प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीला बळी पडू नये असे आवाहन वर्तमानपत्रांतून करण्यात आले होते.

 मात्र आता नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झाल्याची रितसर जाहीरात वर्तमानपत्रे व इतर माध्यमांतून प्रसिध्द झाल्यानंतरही काही व्यक्ती मागील आठवड्यातील सदर बातमीचा मजकूर सोशल माध्यमांव्दारे फिरवून ही भरती सुरू नसल्याची चुकीची माहिती प्रसारित करीत आहेत.

तरी याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता रितसर जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे.

तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी व याविषयीची अधिकृत माहिती जाणून घ्यावी व अर्ज करावेत असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

फणसावरील संशोधनासाठी कृषी विद्यापीठांतर्गत केंद्र स्थापन करण्यात येईल- कृषिमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊनबैठक घेण्याचे सभापतींचे निर्देश..

कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम;झटपट नोकरीसाठी आज (दि.२५) ‘जागेवर निवड संधी’ विशेष मोहिम..

vishwatmaklokswamivarta

४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४-दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना आवाहन ……

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घाटन १२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित- शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

मुंबईतल्या वरळी सी लिंक वर गरुडाचा जीव वाचवण्यासाठी सी लिंकवर उतरले, स्वत:चा जीव गमावून बसले, भीषण अपघात.