vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – ज्येष्ठ शिक्षक आणि शिंदे गटाचे ग्रामीण नेते आबासाहेब पाटील भोसले यांची सदिच्छा भेट अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी करमाड येथे घेतली. दौऱ्यावर असताना भोसले यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

या भेटीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. शेतकरी पुत्र म्हणून दोघांचीही भूमिका शेतकऱ्यांसाठी सक्षम निर्णय घेण्याच्या दिशेने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी क्षेत्रातील अडचणी, मूलभूत सुविधा, शेतकऱ्यांचे हक्क, बाजारपेठेतील समस्या आणि धोरणात्मक बदल यासारख्या मुद्द्यांवर चिंतन करण्यात आले.

शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेविषयीची माहिती भोसले पाटील यांना दिली. संघटनेचे महाराष्ट्रात सध्या जाळे वेगाने विस्तारत असून लवकरच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शेतकरी हा संघटनेचा केंद्रबिंदू असून, त्यांच्यासाठी काय करता येईल यावर लवकरच एक व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत धोरणात्मक चर्चा करून भविष्यातील दिशा निश्चित केली जाणार आहे.

शिवाजीराव सोळुंके पाटील व आबासाहेब भोसले यांची ही भेट शेतकरी प्रश्नांवर एकत्रित भूमिका घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दोघांचीही कार्यपद्धती शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने या चर्चेला स्थानिक पातळीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

संबंधित पोस्ट

प्रशासनिक विभागांनी शासकीय कार्यालयांची  जनमाणसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा आढावा बैठकीत दिले निर्देश

राज्य एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत शासन सकारात्मक- आरोग्य राज्यमंत्री मेघना सासाकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

vishwatmaklokswamivarta

सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध शासकीय योजनांचीजालना जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा- अध्यक्ष शेरसिंग डागोर 

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत*-माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह मुंबई*