vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ..

 

राज्य प्रतिनिधी-फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नंबर 17) नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखेस 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी, शर्तीनुसार नाव नोंदणी करण्याकरता उपलब्ध आहेत. या संदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

खाजगी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी विद्यार्थी / शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कृषी चिकित्सालय फळरोप वाटीका पैठण येथे दि.१२ रोजी चिकु फळपिकाचा जाहीर लिलाव

महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात3 हजार 953 उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंदअप आधारित महाकृषी खरीप मोहिम यशस्वी..

आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

vishwatmaklokswamivarta

|🇮🇳 आज- कोजागरी पौर्णिमा -खंडग्रास चंद्रग्रहण -ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे -नवान्नप्राशन -आकाश दीपदान आग्रयण -कार्तिकस्नानारंभ -कुलधर्म -रात्री लक्ष्मी व इंद्रपूजन -अन्वाधान -भद्रा १५:०४ पर्यत

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी डिएपी खतास पर्यायी खते वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन