vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी काळा किल्ला डेपोतून सुटणाऱ्या बसेस दहा मिनिटाच्या अंतराने सोडण्याची ज्येष्ठांची मागणी

धारावी काळा किल्ला डेपोतून सुटणाऱ्या बसेस दहा मिनिटाच्या अंतराने सोडण्याची ज्येष्ठांची मागणी

मुंबई प्रतिनिधी-: फेस कॉम संलग्न हॅपिनेस्ट ज्येष्ठ नागरिक संघ धारावी व झेंडा ग्रुप ऑफ धारावी यांनी एका संयुक्त निवेदनात ज्येष्ठांच्या सह्यांचे निवेदन बेस्ट व्यवस्थापक काळा किल्ला धारावी डेपो व महाव्यवस्थापक बेस्ट हाऊस कुलाबा येथे विनंती वजा मागणी निवेदन सादर केले आहे त्यामध्ये धारावी काळा किल्ला बस आग्रा मधून सुटणाऱ्या बस सेवा क्रमांक 52 46 164 176 सी 72 तसेच 305 312 463 या बसेस खूप उपयुक्त व प्रवासी सेवेला तसेच बेस्ट उपक्रमाची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी लाभदाय ठरत आहे पण या बस सेवा वेळेवर नसल्यामुळे त्याचा तोटा बस प्रवाशांना तर होतो आणि लाभ मात्र खाजगी वाहनाने वाहतूकदारांना होत असतो त्याचे मुख्य कारण बेस्ट व्यवस्थापकडे बसेस ताफा कमी असल्यामुळे आणि बेस्ट ने सुरू केलेल्या खाजगी वाहतुकीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे व इतर प्रवाशांचे नुकसान तर होतेच बेस्टचे नियोजन बिघडल्याने नाहक त्रास बस प्रवाशांना सोसावा लागतो त्यामुळे कामाच्या व गर्दीच्या वेळी अपुऱ्या व उशिरा येणाऱ्या बस सेवा क्रमांक 52 46 164 176 सी 72 धारावी डेपो टी जंक्शन मार्गे माहीम कडे जाणाऱ्या आणि धारावी डेपोकडून 90 फीट मार्गे बस सेवा क्रमांक ३०५ ४६३ ३१२ १७६ याही गाड्यांची ती स्थिती आहे त्यामुळे बस प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक महिला शाळा कॉलेज विद्यार्थी व श्रमिक कामगार यांच्यामध्ये बेस्ट उपक्रमाबद्दल तीव्र नाराजी आहे येत्या काही दिवसात वरील सर्व मार्गाचे नियोजन व व्यवस्थापन तसेच बस ताफ्यामध्ये वाढ न केल्यास लवकरच लोकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल असा इशारा हॅपीनेस ज्येष्ठ नागरिक संघाचे संपर्कप्रमुख श्री दिलीप गाडेकर आणि झेंडा ग्रुप धारावी यांचे प्रतिनिधी परशुराम जाधव विष्णू कटके यांनी दिला आहे कृपया बेस्ट प्रशासन याची दखल घेईल ही अपेक्षा

संबंधित पोस्ट

मोरा गावातील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावा -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात;नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta

रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार