vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन

जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन

अहिल्यानगर, प्रतिनिधी – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करून प्रत्यक्ष उपस्थित राहावे व रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.

हा उपक्रम बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, टीव्ही सेंटर, अहिल्यानगर येथे होणार आहे.

या उपक्रमात कार्मी सिस्टीम प्रा. लि., फास्ट टॅग सर्व्हिस प्रा. लि. व पिपाडा किया मोटार्स, अहिल्यानगर या तीन खासगी आस्थापना सहभागी होणार आहेत. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी जागेवरच नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केली नसल्यास, त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. तसेच, उपक्रमाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती द्याव्यात.

उमेदवारांनी www.ncs.gov.in या राष्ट्रीय करिअर सेवा संकेतस्थळावरही नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी समन्वयक वसीम खान पठाण (मो. ९४०९५५५४६५) यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

रेणापूर शहर मंडळ भाजपा किसान मोर्चा ओबीसी मोर्चा कार्यकारिणी जाहीर,हारवाडी गावचे उपसरपंच श्री. किरणजी इंगळे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश…

vishwatmaklokswamivarta

शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुनअहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे..

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

जिगाव प्रकल्प : पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा प्राधान्याने द्या- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणप्रत्येक जिल्ह्यात होणार एक ‘मधाचे गाव’-रविंद्र साठे

१०८- औरंगाबाद (पश्चिम) स्वीप उपक्रम’मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta