vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर यांच्या आधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी तत्त्वावर विविध पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वि. ल. कोरडे यांनी केले आहे.

वसतिगृहामध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृह अधीक्षक, सहायक वसतिगृह अधीक्षक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी व सफाई कामगार ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मात्र, माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. वसतिगृह अधीक्षक व चौकीदार यांचा कामाचा कालावधी २४ तासांचा राहील.

अर्जासोबत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळविण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक व नागरी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

विशेष लेख-:हातमाग व विणकारांच्या विकासासाठी शासनाचे प्रयत्न

vishwatmaklokswamivarta

एसटीने घडविले 9.71 लाख भाविकांचे “विठ्ठल दर्शन”; 35.87 कोटी उत्पन्नाची नोंद- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये मोबाइल मेडिकल युनिट्सद्वारे मोफत आरोग्य सेवा सुरू सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत दोन लाख नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्यसेवा…

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं. आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणाशी बोलणार नाही, आम्हाला कोणी सांगायचं नाही असा या सरकारचा जो माज होता तो या आंदोलकानी उतरवला राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख यांची पत्रकार परिषद

vishwatmaklokswamivarta