vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

राज्य प्रतिनिधी-गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीचे प्रमाण वाढत असल्याने वाहनधारकांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळावेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वतीने नवीन मालिका सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंतीचे नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी इच्छुकांनी दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह आरटीओ कार्यालयात सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून १६ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता लिलाव आयोजित करण्यात येईल.

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाकरिता अर्ज १६ मार्च २०२६ रोजी स्वीकारले जाणार असून त्याचा लिलाव १७ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता सहकार सभागृहात करण्यात येणार आहे.

लिलावासाठी सादर करण्यात येणारा डीडी “R.T.O., Pune” या नावे नॅशनलाइज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा व दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी एकच सीलबंद डीडी स्वीकारला जाईल.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८१ च्या नियम ५४अ नुसार पसंतीचा नोंदणी क्रमांक १८० दिवसांपर्यंत वैध राहील. लिलावानंतर उर्वरित क्रमांकांसाठी प्रक्रिया https://fancy.parivahan.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असून इच्छुकांनी आधार संलग्नित मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करून पसंती क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

पुणे आरटीओ कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांचेच अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्न

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव

दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख देवस्थानांची सुरक्षा वाढवली…

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील धुळेकरांनी केले गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत