vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा

 सांगली, प्रतिनिधी: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५-२६ मधील विविध कामांचा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक सागर गवते, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील आदिंसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५-२६ मधील वितरीत निधीचा योग्य व पारदर्शक वापर होणे अत्यावश्यक असून, कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. पूर्ण झालेल्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र, गुणवत्तापूर्ण कामाचे प्रमाणपत्र तसेच काम पूर्ण झाल्याचे फोटो आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत आयपास प्रणालीवर अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्हा विकास आराखड्यांतर्गत प्रस्तावित कामांसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निधीची तरतूद करण्यात यावी. राज्यस्तरीय यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जुलैपूर्वी पूर्ण करावी. योजनानिहाय खर्चाचे नियोजन अचूक ठेवून निधीची योग्य विभागणी करावी. महालेखापाल कार्यालयास सादर करावयाच्या प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रांची पूर्तता तातडीने करावी. तसेच MHUID अंतर्गत मंजूर कामांसाठी युनिक आयडी तयार करून प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले.

यावेळी सन २०२५-२६ अंतर्गत मंजूर कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी सादर करण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रस्तावांबाबतही चर्चा करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

बाल शक्ती पुरस्कार; ऑनलाईन अर्ज आमंत्रित

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड  

vishwatmaklokswamivarta

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘अमृतकाळ विकसित भारत-२०४७ परिषदे’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी