vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 1 लाख 16 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 1 लाख 16 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

बुलढाणा प्रतिनिधी: शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र १ लाख १६ हजार ४३६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. या याद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावचे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, बँक शाखा तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकरी बांधवांनी त्वरित आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हास्तरीय कर्जमुक्ती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांमध्ये नाव असलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी (Farmer ID) आणि आधार कार्ड सोबत घेऊन नजीकच्या ई-सेवा केंद्रावर जावून आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.

योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय अथवा तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने दाद मागता येणार आहे.

सदर कर्जमुक्ती योजनेचे कामकाज सहकार विभाग, महसूल विभाग आणि बँक प्रशासन यांच्यामार्फत एकत्रित व सुयोग्य प्रकारे केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये विनाकारण गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली आहेत, त्यांनी विलंब न करता नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईत बीइएसटी बेस्टच्या तिकीट दरात दुप्पट वाढ; ८ मेपासून नवे दर लागू

विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन संपन्न

आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड, अहिल्यानगर येथे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

सागरी सुरक्षा उपाय आणि अवैध धंद्यांवरील कारवाई मुळे राज्यात सागरी मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिकटन वाढ- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण