vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

          सांगली, प्रतिनिधी : डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरणे आवश्यक आहे. इंटरनेट वापरताना सतर्क व जागरूक राहिल्यास इंटरनेटवरील फसवणूक आपण टाळू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

  सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल, पोलीस हवालदार किरण परदेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, इंटरनेटवरील फसवणूक टाळण्यासाठी सायबर गुन्हे आणि हॅकिंग यासारख्या धोक्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवावी. इंटरनेटचा जबाबदारीने वापर करावा. नवनवीन तंत्रज्ञानाचा सकारात्मक पध्दतीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल यांनी सुरक्षित इंटरनेट दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. पोलीस हवालदार किरण परदेशी यांनी इंटरनेट सुरक्षिततेबाबत माहिती दिली.00000

संबंधित पोस्ट

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

vishwatmaklokswamivarta

जमीन न मिळालेल्या कोयना धरणग्रस्तांनी जमिनीसाठी अर्ज करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे आवश्यक

vishwatmaklokswamivarta

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय – पालकमंत्री शंभूराज देसाई कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व वीरपिता यांचा सत्कार

शेतकरीस्तरीय ई-पीक पाहणीस २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन