vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शहिदांच्या वारसांचे शासकीय जमिन वाटपाचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत.-पालकमंत्री शंभूराज देसाई

शहिदांच्या वारसांचे शासकीय जमिन वाटपाचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत.-पालकमंत्री शंभूराज देसाई

 

सातारा प्रतिनिधी- सातारा जिल्ह्यातील शहिदांच्या माता-वीर पत्नी किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांना शासकीय जमिन वाटपाबाबत शासनाचे धोरण असून सैनिकांबाबतचे प्रश्न यंत्रणेने संवेदनशीलतेने सोडवावेत ज्यांना शासकीय जमिनी देय आहेत अशांना पर्यायी जागा दाखविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शहिद जवानांच्या वारसांना जमिन वाटपा संदर्भातील कामकाजाचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, यांच्यासह शहिद जवानांचे वारस, उपस्थित होते.

 युध्दात किंवा युध्दजन्य परिस्थिती किंवा कोणत्याही लष्करी कारवाईत वीर मरण आल्यास अशा जवानांच्या अथवा अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नी किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांना शेती प्रयोजनार्थ 2 हेक्टर कोरडवाहू जमिन देण्याबाबतचे शासनाचे धोरण आहे. तसेच सन 1971 भारत-पाक युध्दातील व सन 1962 च्या भारत-चीन युध्दातील सन 1965 च्या भारत-पाक युध्दातील व ऑपरेशन पवन मधील युध्दातील शौर्य पुरस्कार मिळालेल्या सैनिकांना किमान एक गुंठा, कमाल 3 गुंठे शेती प्रयोजनार्थ कोरडवाहू 2 हेक्टर जमिन देण्याची तरतूद आहे. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असणारा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहिद जवान, माजी सैनिक यांच्या संदर्भातील प्रश्न संवेदनशीलतेने हाताळावेत असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील 40 शहिदांच्या वारसांना त्यांचा पसंतीक्रम मिळविण्यासाठी 4 पर्यायी जागा दाखविण्यात याव्यात. असेही त्यांनी यावेळी सूचित केले. या बैठकीत त्यांनी सन 1999 मध्ये शहिद झालेले गजानन मोरे यांच्या वीर माता श्रीमती चतुराबाई मोरे यांना जागा वितरणाचे प्रमाणपत्र सन्मानपूर्व प्रदान केले.

0 0 0 0

संबंधित पोस्ट

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहयोगाने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम**श्रीसदस्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना सेवाभावी आदरांजली*

सिडकोच्या अखत्यारीतील ३ स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित,तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी स्थानके मध्य रेल्वेच्या ताब्यात नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर  खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश…

सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत

जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या विषयावर‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा विशेष संवाद..

vishwatmaklokswamivarta

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड