vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

जालना प्रतिनिधी-गावातील रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदारांने पूर्ण कामाचे बिल उचलून घेतल्याचा प्रकार जालना तालुक्यातील हस्ते पिंपळगाव येथे उघडकीस आला असून रस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी ( दि. ६) थेट जिल्हा परिषद कचेरी काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर रस्त्याअभावी होणारी कैफियत मांडली.

 जालना तालुक्यातील हस्ते पिंपळगाव येथे जालना जिल्हा परिषद अंतर्गत सुधारणा मंजुरीतून हस्ते पिंपळगाव ते शेवगा रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पूर्ण काम केल्याचे बिल उचलले असल्याची तक्रार केशव अंबादास शिंदे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. २६ मे २०२३ रोजी तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी अर्धवट कामाचा पंचनामा केला. रस्ता अर्धवट व नाली बांधकाम न झाल्याने ग्रामस्थांना येण्या- जाण्यासाठी त्रास होत असल्याची तक्रार घेऊन केशव शिंदे, गजानन नानोटे यांच्या नेतृत्वाखाली महिला- पुरूष मंडळींनी शुक्रवारी ( दि. ६) थेट जिल्हा परिषद कचेरी गाठली. मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार हे परगावी असल्याने या ग्रामस्थांनी उपलब्धप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांची भेट घेऊन त्यांच्या समोर रस्त्याची कैफियत मांडली. तुबाकले यांनी हे प्रकरण तातडीने बांधकाम विभागाकडे चौकशीसाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी निवेदन सादर करून अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करा, अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई करावी, नसता ९ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे.

     यावेळी ग्रामस्थ वामन किटाळे,बाबासाहेब किटाळे, मुक्ताबाई नानोटे, शोभा शिंदे, मदन नानोटे, सविता किटाळे, गंगुबाई किटाळे, लीलाबाई भांदरगे,सुमन वाघमारे, रंजना किटाळे, राजू नानोटे, विठ्ठल किटाळे, सुधाकर वाघमारे, मोहन वाघमारे, अंकुश किटाळे, मधुकर वाघमारे आदींची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

रेल्वे मालवाहतुकीला मिळणार नवा वेग 172 कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी

बेसा-बेलतरोडी-पिपळा व परिसरातील विकासात नागरी सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

एमएचटी-सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची 5 मे रोजी फेर परिक्षा…

महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा पश्चिम बंगालचे उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्द राज्यपालांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला कौतुकाची थाप

कोटगलचा एल्गार: दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर!

सेवा हक्क कायद्याचा व्यापक प्रचार करा – राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव