vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून तातडीने मदत करावी ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून तातडीने मदत करावी ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी अतिवृष्टीने मुंबईतील झोपडपट्ट्या वस्त्यांमध्ये आणि राज्यभरात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे राज्यसरकारने त्वरित पंचनामे करून अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना आज भरपावसात केंद्रिय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मुंबईतील बांद्रा येथील वाल्मीकी नगर ; महाराष्ट्र नगर; खेरवाडी; खार; मिठी नदी परिसरातील वस्त्यांना ना. रामदास आठवले यांनी आज भेटी देऊन पाहणी केली.यावेळी खेरवाडी पोलिस स्टेशन च्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुप्रिया पाटील या उपस्थित होत्या.तसेच रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; अमित तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

खेरवाडी बीकेसी येथील वाल्मीकी नगर मधील वरदान आनंद झंझोटड हा तरुण येथील नाल्यात वाहून गेल्याची माहिती येथील वस्तीतील रहिवासियांनी दिली.तिथे न.रामदास आठवले यांनी भेट दिली.वाहून गेलेला तरुणाचा शोध अद्याप लागलेला नाही. नाल्याशेजारीही वस्ती असून पावसात नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरते. त्यामुळे नाल्या शेजारी राहणाऱ्या वाल्मिकी नगर महाराष्ट्र नगर झोपडिवासीयांच्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत उभारण्याची सूचना आपण जिल्हा अधिकारी; महापालिका आणि प्रशासनाला करणार असल्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले. वाल्मिकीनगर मधील नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबाला राज्य शासनाने मदत करण्याची मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे

अतिवृष्टीने मुंबईतील चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.ग्रामीण भागात पीकपाणी वाहून गेले आहे.राज्य सरकार नदी जोड प्रकल्प उभारत आहे.तरीही मुंबई कोकण राज्यभरात होणाऱ्या अतिवृष्टीचे पाणी समुद्रात वाहून जाते ते पाणी धरणामध्ये वाळवावे; जिथे दुष्काळी भाग आहे अशा भागात अतिवृष्टीचे पाणी वाळवावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

000000

संबंधित पोस्ट

*राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत* *कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न* *कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य प्रेरणादायी*

vishwatmaklokswamivarta

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

मराठी भाषा संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात प्राधान्याने मराठीचाच वापर करावा – अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार

vishwatmaklokswamivarta

न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात येणार मोबाईल व्हॅन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी; प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना