vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

परतूर ( प्रतिनिधी :– परतूर येथील आदिवासी आश्रमशाळेत “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम मेरा युवा भारत, जालना व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रम हे प्रणित सांगवीकर, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

         कार्यक्रमाला आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या परतूर तालुका समन्वयक अमृता ठाकुर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रस्तावना मांडली. प्रमुख मुख्याध्यापक श्री. एस. बी. जाधव यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. मुसळे सर तसेच अधीक्षिका श्रीमती पल्लवी अनकर यांचे विशेष योगदान लाभले.

         सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थिनींना अमृता ठाकूर यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. या सत्रामध्ये मुलींच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. मासिक पाळी स्वच्छता, पोषण, मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास वाढविण्याविषयी संवाद साधला गेला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुलींनी रंगीबेरंगी व आकर्षक रांगोळ्या काढून आपली कलात्मकता आणि सर्जनशीलता सादर केली.  कार्यक्रमाला आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित पाहुण्यांनी व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

संबंधित पोस्ट

आषाढी एकादशी यात्रा: पूर्वतयारी आढावा बैठक भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकला सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित- शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार- मंत्री प्रताप सरनाईक