vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदि कर्मयोगी अभियानांतर्गत जिल्ह्यातील ११३ गावांच्या विकास आराखड्यांना मंजुरी

आदि कर्मयोगी अभियानांतर्गत जिल्ह्यातील ११३ गावांच्या विकास आराखड्यांना मंजुरी

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी

महात्मा गांधी जयंतीदिनी जिल्ह्यातील आदिवासी भागासाठी महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. भारत सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘आदि कर्मयोगी अभियानांतर्गत’ जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ११३ गावांच्या ग्राम विकास आराखड्यांना (Village Development Plans) विशेष ग्रामसभांमध्ये मंजुरी देण्यात आली.

या विकास आराखड्यांनुसार सन २०३० पर्यंत गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘आदि सेवा पर्व अभियान’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या दरम्यान आदि कर्मयोगी स्वयंसेवकांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रत्येक आदिवासी वाड्याला भेट देत शिबिर फेऱ्या आयोजित केल्या. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण यांसंबंधी अडचणींची तपासणी करून ग्रामनिहाय माहिती संकलित करण्यात आली. या माहितीच्या आधारे संबंधित गावांचे विकास आराखडे तयार करण्यात आले.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशांन्वये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सर्वानुमते पुढील ५ वर्षांसाठी विकास कामांना हिरवा कंदील दाखविण्यात आला.या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आदिवासी वाड्यांच्या विकासाला गती मिळणार असून, मूलभूत सुविधा व विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे ‘विकसित भारत’ या संकल्पनेला चालना मिळेल.

००००

संबंधित पोस्ट

महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- महाज्योतीला 1500 कोटींचा निधी ; इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 63 वसतिगृहे

जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणीमुंबईत जलवाहतुकीत लवकरच नवीन तंत्रज्ञान क्रांती..

vishwatmaklokswamivarta

केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान-कापूस कांतीकापूस पीकासाठी १०० टक्के अनुदानावर प्रात्यक्षिक