विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाज जालना जिल्हा यांचा आक्रोश मोर्चा
जालना प्रतिनिधी सकल मातंग समाज जालना जिल्हा यांचा आक्रोश मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्यापासून गांधीचे मन कचेर रोड उड्डाणपूल नूतन वसाहत सभेत रूपांतर झाले यावेळी श्रीकृष्ण पांडव अशोक साबळे निखिल पगारे संदीप खरात सुनील रतन मार्केट डावी गायकवाड संदीप साबळे संतोष तुपसुंदर अंकुश राजगिरे किरण शिरसाट राम सुतार पीटर खंदारे प्रमोद खरात अर्जुन धाकतोडे रवी पांडव विकी हिवाळे सचिन घोडे सचिन लोंढे श्याम सराटे रवी पाखरे संतोष निकाळजे यावेळी उपस्थित होते छायाचित्र किरण खानापुरे
विविध मागण्यांच्या अनुषंगाने तसेच विकास लोंढे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची िशक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने जालना शहरात मंगळवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरु होऊन गांधी चमन, कचेरी रोड, उड्डाणपुल मार्गे नुतन वसाहत येथे आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
विकास लोंढे याचा खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, हा खून खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा, या खून प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग तरुणाबाबत जी घटना घडली, त्यात कारवाई करावी, जालना जिल्ह्यात दलीत समाजाच्या जागांवर काही ठरावी गुंडांनी अतिक्रमण केले आहे, त्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला श्रीकृष्ण पांडव, अशोक साबळे, निखिल पगारे, संदीप खरात आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाला आमदार अर्जून खोतकर यांनीही भेट दिली आहे.