vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हास्तरीय चाचा नेहरु  बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात …       

जिल्हास्तरीय चाचा नेहरु  बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात …

 

 जालना, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयंसेवी बालगृहामधील अनाथ, निराश्रीत आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी दि. 19 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालयाचे मैदानावर तीन दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हयाचे अपर पोलीस अधिक्षक मा. श्री आयुष नोपाणी सर, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव बंडकर एन. एम. सर यांचे हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून आणि आकाशात तिरंगी व बहुरंगी फुगे सोडून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी केले. उदघाटन प्रसंगी अपर पोलीस अधिक्षक नोपाणी सर आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव मा. बंडकर सर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत आणि सदस्या विद्या लंके यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

बाल महोत्सव म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही तर बालकांच्या सुप्त कला गुणांना वाव देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी उपलब्ध करून दिलेले एक व्यासपिठ आहे. सदरील बाल महोत्सवामध्ये कब्बडी, 100 मी. धावणे, गोळा फेक, थाळी फेक, लिंबु चमचा रेस, पोत्यामधून चालणे इत्यादी मैदानी खेळ आणि कॅरम, बुध्दीबळ, चित्रकला, निबंधस्पर्धा या सारखे इनडोअर गेम तसेच एकल व समुह गायन, एकल व समुह नृत्य, वक्तृत्व स्पर्धा या सारखे सांस्कृतीक कार्यक्रम असे भरघोस कार्यक्रम घेवून तिन दिवस मुलांना त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मा. अपर पोलीस अधिक्षक श्री नोपाणी सर म्हणालेकी, मुलांनी अभ्यासा सोबतच खुप खेळले पाहिजे खेळ हा फक्त जिंकण्यासाठीच नाही तर खुप मौजमस्ती करण्यासाठी खेळला पाहिजे. तसेच पोलीस विभागा मार्फत सदर कार्यक्रमासाठी पोलीस मैदान तर उपलब्ध करून दिले आहे आणिखी काही आवश्यकता असेल तर ते सांगावी असेही ते म्हणाले. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री बंडकर सर यांनी ही मुलांना मुलांना खेळ किती महत्वाचा आहे या बाबत मार्गदर्शन केले. तसेच मुलाच्या मैदानी खेळास हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करून दिली. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर

जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रचाररथांच्या माध्यमातून ‘तलावांचे पुनरुज्जीवन’ कामांना वेगशासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व गावांनी पुढे यावे

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”