vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मइतर

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

==========

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज कौस्तुभ पुरस्काराने सन्मानित शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्रत्येक युगाची आवश्यकता- निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

============

जालना/प्रतिनिधी : महाराष्ट्राचा तीन दिवसीय 59वा वार्षिक निरंकारी संत समागम 26 जानेवारी रोजी सांगलीमध्ये भव्य रुपात यशस्वीरित्या संपन्न झाला. समागमाच्या समापन सत्रामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी लक्षावधी भाविक भक्तगणांना संबोधित करताना सांगितले, की शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्राप्त करुन जीवनात प्रेम, दया आणि करूणेचा भाव अंगीकारणे ही प्रत्येक युगाची आवश्यकता राहिली आहे. सतगुरु माताजी म्हणाल्या, की मानवाचा दृष्टिकोण बहुधा नकारात्मक होऊन जातो. त्यामुळे तो चांगुलपणामध्येही दोष शोधत राहतो. याउलट संतजन परमात्म्याच्या जाणीवेमध्ये जगून अंधारातही प्रकाश किरणाला आधार बनवतात. ब्रह्मज्ञानाद्वारे ते स्वत:चे जीवन उज्ज्वल करतातच, शिवाय समाजालाही प्रकाशमान करतात. संतांच्या जीवनाचे वैशिष्ट्य समजावताना माताजी म्हणाल्या, की संतांचे जीवन दिखावा, कट-कारस्थानापासून मुक्त आणि सहज, सरळ व सकळांच्या कल्याणासाठी समर्पित असते. सतगुरु माताजींनी निरंकारी भक्तांना सत्संग, सेवा व सिमरणाच्या माध्यमातून आत्ममंथन करत सजग व सकारात्मक जीवन जगण्याचे आवाहन केले. समागमाच्या तिन्ही दिवशी आत्ममंथन या विषयावर कवि दरबाराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये देश-विदेशातील एकंदर 22 कवी व कवियित्रींनी मराठी, हिंदी, पंजाबी, हरियाणवी, भोजपुरी व इंग्रजी भाषांच्या माध्यमातून काव्य पाठ प्रस्तुत केला ज्याचा भरपूर आनंद श्रद्धाळु भक्तांनी प्राप्त केला. समागमाच्या तिसर्‍या दिवशी महाराष्ट्र स्टेट जर्नलिस्ट्स एसोसिएशन यांच्या वतीने वर्ष 2026 चा प्रतिष्ठित कौस्तुभ पुरस्कार सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री माननीय श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान केला गेला. या प्रसंगी असोसिएशनचे संस्थापक श्री.संजयजी भोकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. समागमाच्या पहिल्या दिवशी सत्संग कार्यक्रमा दरम्यान सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या करकमला द्वारे समागम विशेषांक आत्ममंथन आणि ‘गुरूदेव हरदेव’ या पुस्तकाची नूतन भाषांतर आवृत्ती तसेच अन्य पुस्तकांच्या भाषांतर आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या सर्व प्रकाशन सामग्री व मिशनच्या पत्र-पत्रिका समागम मध्ये लावलेल्या प्रकाशनाच्या 6 स्टॉल्सवर अत्यंत माफ़क दरात उपलब्ध आहेत ज्याचा लाभ श्रद्धाळू भक्तगण मोठ्या उत्साहाने घेत आहेत. समागमाच्या दुसर्‍या दिवसाची सुरूवात एका आकर्षक सेवादल रॅलीने झाली ज्यामधेय महाराष्ट्रासह अन्य ठिकाणांहून आलेल्या हजारो सेवादल बंधु-भगिनी आपआपली खाकी-निळी वर्दी परिधान करून सहभागी झाले होते. सतगुरू माताजी व निरंकारी राजपिताजींचे रॅलीमध्ये आगमन होताच मंडळाच्या सेवादल आधिकार्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन या दिव्य युगुलाचे सहर्ष स्वागत केले. सेवादल रॅलीच्या प्रारंभी सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या करकमलाद्वारे शांतीचे प्रतिक असणारा मिशनचा श्वेत ध्वज फ़डकवला. या रॅलीमध्ये बँण्डच्या सूरात पी.टी.परेड, संगीतमय योगा, मानव पिरॅमिड, मल्लखांब, एरोबिक, उम्ब्रेला फॉर्मेशन तसेच अनेक विविध खेळ प्रकार व साहसी कवायती प्रस्तुत केल्या. त्याचबरोबर मिशनच्या शिकवणीवर आधारित विविध भाषांच्या माध्यमातून लघु नाटिका सादर करण्यात आल्या ज्याद्वारे भक्तीमधील सेवेचे महत्व अधोरेखित केले गेले तसेच अहंकार रहित होणे, सेवेमधील चेतनता व आदर भाव इत्यादी दिव्य गुण धारण करण्याची प्रेरणा देण्यात आली.सेवादल व श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सतगुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी प्रतिपादन केले, की जीवनात निराकार परमात्म्याला प्राथमिकता देत समर्पित भावनेने सेवा करायची आहे. सेवा केवळ एक कार्य नसून ते पूर्ण मनोभावे श्रद्धा व सत्कार भावनेने करायची भावना आहे. सेवेच्या सोबत जीवनात सत्संगला महत्व देणे सुद्धा सेवेचेच एक रूप आहे. सेवेच्या मूळ भावनेला समजून केले गेलेले कार्यच जीवनामध्ये सुधार करते. समागमात उभारलेली भव्य निरंकारी प्रदर्शनी श्रद्धाळूंच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. या वर्षी सदर प्रदर्शनी ‘आत्ममंथन’ या विषयावर आधारित असून ज्यामध्ये आत्मचिंतन, आत्मबोध आणि मानवी मुल्यांचे महत्व अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने प्रस्तुत केले आहे. ही प्रदर्शनी मुख्यतः तीन भागांमध्ये विभागली आहे. तिच्या मुख्य भागात मिशनचा इतिहास, विचारधारा तसेच देश-विदेशात केले जाणारे मानवतेसंबंधी निष्काम सेवा कार्यांचे प्रतिबिंब दर्शवले आहे. दुसर्‍या भागात बाल-प्रदर्शनी उभारली असून त्यामध्ये बालकांना उज्ज्वल जीवन जगण्याची प्रेरणा देणारे शिक्षाप्रद आकर्षक मॉडेल्स बनवले आहेत ज्याचा उल्लेख निरंकारी राजपिताजी यांनी आपल्या विचारांमध्येही केला. प्रदर्शनीच्या तिसर्‍या भागात मिशनची समाजकल्याण शाखा ‘संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन’च्या माध्यमातून राबवल्या जाणार्‍या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देणार्‍या प्रदर्शनीचा समावेश आहे. समागमात येणार्‍या सर्व श्रद्धाळूंसाठी दिवस-रात्र सामूहिक भोजनाची (लंगर) व्यवस्था मैदानाच्या तिन्ही भागांमध्ये केली आहे. एका लंगर स्थानावर एकाच वेळी जवळपास 10,000 श्रद्धाळू भोजन करू शकतात. या व्यतिरिक्त 4 कँटीनची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये अत्यल्प दरात चहा, कॉफी, शीत पेय व अल्प-उपहार उपलब्ध आहेत. मिनरल वॉटरची देखील उचित व्यवस्था याच कँन्टीनमध्ये करण्यात आली आहे. स्वास्थ्य सेवा समागम स्थळावर तीन डिस्पेंसरी, दोन प्राथमिक चिकित्सा केंद्र तसेच आईसीयू सुविधेसहित हॉस्पिटलची व्यवस्था केलेली होती. लोपॅथी, आयुर्वेद व होमिओपॅथी पद्धतिने जवळ जवळ 50,000 भाविकांना स्वास्थ सेवा प्रदान केल्या गेल्या. या व्यवस्थेमध्ये 54 डॉक्टर्स व 326 चिकित्सा कर्मचारी कार्यरत होते. आपत्कालीन परिस्थितीत सेवेसाठी 11 म्ब्युलन्स तैनात होत्या. प्रशंसनीय आहे, की कायरोप्रॅक्टिक चिकित्सा शिबिरामध्ये विदेशातून 23 तर भारतातून 2 विशेषज्ञांनी आपल्या निष्काम सेवा प्रदान केल्या. तीन दिवसांमध्ये जवळपास 3,000 भाविकांनी या चिकित्सेचा लाभ घेतला.

=========

संबंधित पोस्ट

चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु- रुपाली चाकणकर – राज्य महिला आयोग

vishwatmaklokswamivarta

आदेश अदिनाथ शिवजी को आदेश,आदेश चैतन्य कानिफनाथजी मढिनीवासी योगिराज को आदेश,बोल कानिफनाथ महाराज की जय:

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची पद्धती आर्यादुर्गा देवीच्या उपासना मध्ये सप्तशती पाठाचे महत्व अनन्य साधारण आहे म्हणून ज्या आर्यादुर्गा देवी भक्तांना नियम पाळून सप्तशती पाठ करावयाचा असल्यास त्यासंबंधी माहिती ..

अनेकतेत एकतेचा अनुपम नजारा* निरंकारी सामूहिक विवाह सोहळा,महाराष्ट्रासह देश0विदेशातील 126 जोडपी विवाहबद्ध…

vishwatmaklokswamivarta