vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी

        सांगली, द प्रतिनिधी) : आपल्या मृत्यूनंतरही आपली आयुष्यभराची पुंजी समाजाच्या कामी यावी, या उदात्त भावनेतून सांगलीतील दिवंगत शिक्षिका हेमा विजय भडभडे यांनी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा पाटील उपस्थित होत्या.

  समडोळी हायस्कूल, समडोळी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या हेमा भडभडे यांनी आपल्या अध्यापन काळात शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. केवळ ज्ञानदानच नव्हे, तर उच्च नीतीमूल्ये जोपासणाऱ्या हेमा भडभडे यांनी आपल्या मृत्युपत्रात आपल्या कमाईमधील 5 लाख रूपये समाजोपयोगी कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास द्यावेत, अशी एक विशेष तरतूद केली होती. याच इच्छेचा मान राखून त्यांचे नातेवाईक केदार किशोर सहस्त्रबुद्धे व सौ. भाग्यश्री किशोर सहस्त्रबुद्धे यांनी 5 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मदतीचा हात पुढे केला.

     जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या दातृत्वाचा गौरव केला. यावेळी ते म्हणाले, विविध आपत्कालिन परिस्थितीत आणि गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा सामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरतो. हेमा भडभडे यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्तींमुळेच समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात मिळतो. त्यांची ही मदत गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. नागरिक, संस्था आणि उद्योजकांनी अशा प्रकारे स्वेच्छेने पुढे येणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

0000000

संबंधित पोस्ट

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य..

रत्नागिरी  मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

सोमवारी डाक अदालतीचे आयोजन

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी

पोलिस भरतीमध्ये जालना येथील स्व.भूदेवी किशनराव गोरंट्याल क्रीडा प्रबोधिनी मधील विद्यार्थ्यांची निवड

आदिवासी आश्रम शाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके*आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवासुविधांकरिता भरघोस निधी उपलब्ध केला जाईल

vishwatmaklokswamivarta