vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

 

सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील दलित, मागास स्त्रिया व उपेक्षित कष्टकरी वर्गाचे सामाजिक, शैक्षणिक प्रबोधन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या जिल्हयातील एका संस्थेस रु. १० हजार रुपये व एका व्यक्तीस ७ हजार रुपयांचा प्रोत्साहनात्मक पुरस्कार देण्यात येणार आहे. सातारा जिल्हा परिषदेकडून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त जिल्ह्यातील पात्र व्यक्ती व संस्थांकडून विहीत नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

पुरस्कारासाठी सादर करावयाच्या प्रस्तावाच्या नमुन्याच्या प्रती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. संस्था व व्यक्ती यांना पोलिस अधिक्षक यांचा चारित्र्य दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन) असणे गरजेचे आहे. पात्र संस्था व व्यक्ती यांनी आपले अर्ज 9 जानेवारी 2025 अखेर सायंकाळी 6.15 वाजेपर्यत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यालयात पाठवावेत. संस्थेची व व्यक्तीची निवड ही निवड समितीमार्फत छानणीनंतर करण्यात येईल.  0000

संबंधित पोस्ट

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.

सर्वांना निरोगी आयुष्य दे… बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे – विठुराया चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घातलं साकडं विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केली गेली आरोग्यदायी सेवा

महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद*

मराठवाड्यावर कायमस्वरूपी अन्यायकारक ठरणारा गोदावरी अभ्यास गट 02 मांदांडे समितीच्या अहवालाच्या विरोधात जनजागृती अभियान – डॉ संजय लाखेपाटील

वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा

मोठी बातमी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता..