vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जात प्रमाणपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे-मेघराज भाते               

जात प्रमाणपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे-मेघराज भाते

  सांगली, प्रतिनिधी : शासनाच्या जात पडताळणी शिबिराचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जात पडताळणी करून घ्यावी व होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा जाती पडताळणी प्रमाणपत्र समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी केले. सांगली हायस्कूल सांगली येथे आयोजित जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते.

  शाळेचे उपप्राचार्य सी. एस.ऐनापुरे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करणे विद्यार्थ्यांकरिता किती महत्त्वाचे आहे याबाबत माहिती दिली. तसेच शैक्षणिक दृष्ट्या व पुढील शिक्षणाकरिता जात प्रमाणपत्र काढून आपले शैक्षणिक नुकसान टाळावे, असे ते म्हणाले.

 समतादूत विक्रांत शिंदे व सविता पाटील यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी साठी लागणारी कागदपत्रे तसेच ऑनलाईन अर्ज कसा करावा यासंदर्भात सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व शंका यांचे निरसन करण्यात आले.

स्वागत मेघा आलासे यांनी केले. आभार सुशांत जाधव यांनी मानले. तसेच या कार्यक्रमासाठी सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष रविराज फल्ले, उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले, संशोधन प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

समतादूत संयोगिता हेरकळ यांनी शिबिराचे आयोजन केले. कार्यक्रमास समतादूत सागर आढाव, अंकुश चव्हाण, शहाजी पाटील, संग्राम छत्रे, आबासाहेब भोसले व शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे विकासकामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा..

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा* *4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली* 

अनधिकृत मासेमारी नियंत्रण व सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना,अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा व मत्स्योत्पादनात वाढ- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta