vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आरटीई प्रवेशासाठी पालकांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

आरटीई प्रवेशासाठी पालकांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

       लातूर, प्रतिनिधी: आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते.यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. त्यामुळे पालकांना त्यांच्या बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक(प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.

   बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 मधील कलम 12(1)(सी)नुसार आरटीई 25 टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुली व मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. पालकांना प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देण्याचे गैरप्रकार निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक), प्रशासन अधिकारी महानगर पालिका/नगरपालिका, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या depmh2@gmail.com व आयुक्त(शिक्षण), पुणे यांच्या educommoffice@gmail.com या ई-मेलवर अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदवावी.

   प्रलोभन देण्याचा असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरूपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ जालना शहरात भव्य महिला रॅली,महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – शुभांगी देशपांडे

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी साधला संवाद; सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

विशेष लेख -:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत,उत्सवअभिजातमराठीचा शासकीय प्रयोजनात मराठी

vishwatmaklokswamivarta