vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी : आपल्या परिसरात कुठेही अनधिकृत, बालगृहे, वसतिगृहे चालवली जात असल्याचे आढळताच टोल फ्री क्रमांक १०९८ वर तत्काळ माहिती द्यावी व बालकांच्या शोषणास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे विनापरवानगी बालगृहे, वसतिगृहे आणि अनाथाश्रम चालवले जात असल्याचे वृत्त माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले. या ठिकाणी बालकांना जबरदस्तीने ठेवून त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. ही बाब अतिशय गंभीर असून बाल न्याय अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र बाल न्याय नियम २०१८ यांचे सरळ उल्लंघन आहे. या अधिनियमाच्या कलम ४२ नुसार, अशा प्रकारच्या संस्थांना आवश्यक ती मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्राविना संस्था चालवणाऱ्या व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास व किमान १ लाख रुपयांचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतो.
नागरिकांनी आपल्या परिसरात अशा कोणत्याही अनधिकृत संस्थांची माहिती मिळाल्यास त्वरित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अथवा चाईल्ड हेल्पलाइन टोल-फ्री क्रमांक १०९८ वर माहिती द्यावी, जेणेकरून बालकांवरील शोषण रोखता येईल. बालकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नागरिकांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.
0000000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

vishwatmaklokswamivarta

सहकार विभागातील तक्रारींच्या निराकरणासाठी सहकार संवाद पोर्टल- जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे

राज्यात दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” मोहिमेचे आयोजन

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे लोकभवन येथे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीचीयात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठीसर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट-भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार..