vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार 

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार

 

सातारा प्रतिनिधी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी व वेदनादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे येथील त्यांच्या गावी मुक्कामी असून या ठिकाणी ते माध्यमांशी बोलत होते.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुंडमळा हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी इंद्रायणी नदीवर जुना लोखंडी पूल पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून आपण घेतली असून सदरची घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे. 38 लोकांना एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमने सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. त्यांना स्थानिक लोक ही मदत करत आहेत, बचाव कार्य सुरू आहे. दोन लोकांचा यामध्ये मृत्यू झाला असून सहा लोक जखमी आहेत. जखमींना उपचार करणे व त्यांच्या जीव वाचवणे यासाठी प्रयत्न चालू आहेत. जे लोक दुर्घटनेत सापडले आहेत, त्यांना लवकरात लवकर शोधून बाहेर काढणे याला प्राधान्य प्रशासन देत आहे असे सांगून

अशा सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे, अशा सूचना दिल्या जातील. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल, असेही श्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा काढून सिन्दुर ऑपरेशनचा विजय साजरा*

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले**किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान दि. 17.08.2025 (सकाळी 8 वाजेपर्यंत)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी …

vishwatmaklokswamivarta