vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशःपारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्यासाठी दि.४ ते ८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशःपारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्यासाठी दि.४ ते ८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

 

छत्रपती प्रतिनिधी- जिल्ह्यातील पारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्याबाबत शासननिर्णयात निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार स्वःताची ओळख उघड करु इच्छिणाऱ्या व नोंदीत असलेल्या ७८४ पारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्र देण्यासाठी सोमवार दि.४ ते शुक्रवार दि.८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करुन सगळ्यांना ओळखपत्रे उपलब्ध करुन द्यावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर तसेच सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी शासकीय वसतीगृह, घर घर संविधान अभियान, ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती, जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचा आढावा घेतला. तृतीय पंथी अर्थात पारलिंगी व्यक्तिंसंदर्भात तक्रारनिवारण समितीचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.१३ डिसेंबर २०१८ च्या शासननिर्णयानुसार तृतीयपंथ व्यक्तिंना ओळखपत्रे देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ७८४ व्यक्तिंनी स्वतःची पारलिंगी व्यक्ति म्हणून ओळख उघड करण्यास संमती दर्शविली आहे. या सर्व व्यक्तिंना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया राबवावी. त्यासाठी सोमवार दि.४ ते शुक्रवार दि.८ ऑगस्ट दरम्यान सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

 

०००००

संबंधित पोस्ट

खोटे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नती घेतलेल्या अधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल करून बडतर्फ करा-भारतीय मानवाधिकार संघटन ची मागणी

पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 23 जून 2025 रोजी मुंबईत ‘संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

मुंबई येथे श्री ष ब्र १०८ श्रीगुरु डॅा. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट!