vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

        सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लि. सांगली शाखा शिराळा येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आयोजित आर्थिक समावेशन अंतर्गत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा करण्यात आला.    या कार्यक्रमास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक अक्षय गोंडेवार, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी विश्वास वेताळ, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका विभागीय अधिकारी श्रीरंग शेळके, वसुली अधिकारी विश्वास जाधव, शाखाधिकारी अवधूत चव्हाण, बँक मुख्य कार्यालयाचे राकेश महाडिक उपस्थित होते.

      या मेळाव्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक अक्षय गोंडेवार यांनी रि-केवायसी, ग्राहकाच्या ठेवीचे संरक्षण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ग्राहकाप्रती असणारी धोरणे, डिजिटल फ्रॉड बाबत व जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी विश्वास वेताळ यांनी जन धन खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना व सायबर क्राईम विषयी महत्वपूर्ण माहिती उपस्थित ग्राहकांना दिली.

   ज्या ग्राहकांनी रि-केवायसी केलेली नाही त्यांनी बँकेशी संपर्क साधून आपल्या खात्याची रि-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन या मेळाव्यात मान्यवरांनी केले. उपस्थित ग्राहकांच्या शंकांचे निरसन अधिकाऱ्यांनी केले. प्रास्ताविक व आभार राकेश महाडिक यांनी मानले.

00000

संबंधित पोस्ट

खंडोबा देवाची यात्रेनिमित्त पाल परिसरातील वाहतूक मार्गात बदल*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर-धानोरा  मार्गावरुन निघालेल्य बसला अपघात प्रवासी बस उलटून 2 ठार, 17 जखमी

vishwatmaklokswamivarta

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

धारावी काळा किल्ला डेपोतून सुटणाऱ्या बसेस दहा मिनिटाच्या अंतराने सोडण्याची ज्येष्ठांची मागणी

vishwatmaklokswamivarta

अभय योजना २०२५ अंतर्गत एचएएल मार्फत एकाच वेळी २,४७०.९७ कोटींची भरपाई प्रलंबित कर देयक असलेल्या सार्वजनिक उपक्रमांना (पीएसयू)कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta