vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांना पाचशे अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय..

रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांना पाचशे अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय..

राज्य प्रतिनिधी -रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी तयारी केली आहे. दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांना पाचशे अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे सणाच्या काळात रेल्वे प्रवासातील गर्दी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी सिकंदराबाद स्थानकावर विशेष “होल्डींग क्षेत्र” उभारण्यात आले आहे. या ठिकाणी गर्दीच्या वेळी प्रवाशांना थांबण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही व्यवस्था नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतर परिस्थितीनुसार पुढील योजना आखण्यात येईल.

रेल्वेने या कालावधीत विशेष गाड्या, वाढीव डबे, अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा यांची तयारी केली आहे. स्टेशन परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि नियंत्रण कक्ष यांसारख्या सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, तिकीट आगाऊ आरक्षित करून प्रवासाचे नियोजन करावे आणि गर्दीच्या काळात संयम पाळावा.

संबंधित पोस्ट

ऑपरेशन सिंदूरचा समग्र राजकीय-लष्करी उद्देश पाकिस्तानला छुपे युद्ध लढल्याबद्दल शिक्षा करणे हा होता; पाक-पुरस्कृत दहशतवाद ही एक सुनियोजित रणनीती आहे : लोकसभेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म,विधानपरिषदेतील अभिनंदन ठरावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर

साई नगरी शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा काय म्हणाले ते पहा-

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

दिशा समितीच्या बैठकीत जलजीवन मिशन, महावितरण, रस्ते विकासासह विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा व सूचना

vishwatmaklokswamivarta

दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी १९२० शाळांमध्ये पालक सभा चांगले नागरिक घडविण्यासाठी संस्कार आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta