मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीचीयात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठीसर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा प्रतिनिधी: मांढरदेव श्री क्षेत्रकाळूबाईदेवीची यात्रा 2 जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्राशांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधितयंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यात्राकालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशजिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.मांढरदेवी येथील श्री. काळेश्वरीची यात्रेसंदर्भातआज जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एमटीडीसी हॉल, मांढरदेव येथेबैठक संपन्न झाली. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेशखरमाटे, वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारीदेविदास ताम्हाणे त्यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यात्रेत पशुहत्या होणार नाही याची खबरदारीघ्यावी. या काळात पशुपक्षी बळी प्रतिबंध करण्याकरीता भरारी पथकांची नियुक्तीकरावी. ही भरारी पथके वाई व भोर येथून येणाऱ्या मार्गांवर ठेवावी. यात्रा कालावधीत50 मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. या टॉयलेट मधील टाक्यांमध्ये पाणी संपल्यावरतात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे. या टॉयलेटचा किती नागरिकांनी उपयोग केला याचीमाहिती होण्यासाठी नोंदवही ठेवावी. कोणीही उघड्यावर शौचासाठी जाणार नाही याचीदक्षता घेण्यासाठी यासाठी गुड मॉर्निंग पथकाची नियुक्ती करावी. भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही यासाठी अन्न व औषध विभागाने हॉटेलव अन्नदान करणाऱ्या ठिकाणचे पदार्थांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. त्या ठिकाणीस्वच्छता बाळगण्यासाठी खाद्यविक्रेत्यांची बैठक घेऊन याबाबत सूचना द्याव्यात, तपासणीसाठीविशेष दक्षता घेऊन भरारी पथके नेमावीत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटीलयांनी दिले. यात्रा कालावधीत २४ तास अखंडीत विद्युत पुरवठा राहील याची आवश्यक तीखबरदारी घेवून विद्युत विभागाने मागणीप्रमाणे विद्युत जोडणी द्यावी अवैधरीत्याविद्युत पुरवठा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.तसेच खाली आलेल्या वीज तारांचीदुरुस्ती करावी.सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरीलखड्डे भरुन घ्यावेत. रस्त्यावर खड्यांमुळे वाहन बंद पडणार नाही याची दक्षताघेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.पाटील म्हणाले, अपघात प्रवण रस्त्यावरील ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीसविभाग यांनी संयुक्तपणे भेट द्यावी व आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात. यात्राकालावधीत आरोग्य डॉक्टर व औषध सुविधांबाबत जनजागृती आरोग्य विभागाने करावी. जास्तकरुन भाविक हे भाविक भोर तालुक्यातून येतात.त्यामुळे या तालुक्यातील आरोग्य विभागाकडील ही मनुष्यबळाचा उपयोग करावा. अधिग्रहीतकेलेल्या खाजगी हॉस्पीटलमधील बेड व उपचार करणारे डॉक्टर्स राखीव राहतील याचीदक्षता घ्यावी. सुसज्ज अॅब्युलन्सही उपलब्ध ठेवावी. यात्रा कालावधीत संपूर्ण वाईतालुक्यात ड्रायडे घोषित करावा. या कालावधीत अवैधरित्या दारूची विक्री होणार नाहीयाची उत्पादन शुल्क विभागाने दक्षता घ्यावी. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची दळणवळण व्यवस्था चोखपणे पार पाडण्यासाठीविशेष गाड्यांचे व फेऱ्यांचे नियोजन करावे. घाट रस्ता असल्याने एसटी बसेस बंदपडणार नाहीत अशा बसेस पुरवाव्यात. एखादे वाहन बंद पडल्यास ताबडतोब बाजूलाकरण्यासाठी क्रेनची व्यवस्था ठेवावी. चांगली वाहने व सक्षम कर्मचारी कार्यरतठेवावेत. वाहनतळावर भाविकांकरीता किमान मुलभूत सोयी सुविधांची व्यवस्था करावी.येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रकाची प्रसिध्दी करावी. कचऱ्याचे व्यवस्थापनयोग्य पध्दतीने व वेळेत झाले पाहीजे. मोबाईल टॉयलेट पुरेसे उपलब्ध ठेवावेत.यात्रेत परिसरात स्वच्छतेसह शुध्द पिण्याचा पुरवठा करावा. यात्रेसाठी येणाऱ्याखाजगी वाहनांचे पार्कंग व्यवस्था निश्चीत करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी दिले. यात्रेनिमित्त विविध विभागांमार्फत कामे सुरू आहेत ही कामे 31डिसेंबर पर्यंत पूर्ण करावीत. सुरू असलेल्या कामांवर प्रांताधिकारी वाई व तहसीलदारयांनी लक्ष ठेवावे अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी केल्या. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकारघडणार नाही यासाठी चूक पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगून यासाठी अधिकचेमनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.000