vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा प्रशासनाच्या ‘ई-भूमिती’ प्रकल्पाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पुरस्कार प्रदान

जिल्हा प्रशासनाच्या ‘ई-भूमिती’ प्रकल्पाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली, प्रतिनिधी : अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण “ई-भूमिती – मॅपिंग एव्हरी इंच ऑफ गव्हर्नन्स” या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ऑगस्ट क्रांती मार्ग येथे आयोजित 108 व्या स्कॉच समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला.स्कॉच पुरस्कार हा भारतातील प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेणारा एक मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. देशभरातील विविध शासकीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांमधून उत्कृष्ट उपक्रमांची निवड करून त्यांना हा सन्मान प्रदान केला जातो. त्यामुळे या पुरस्कारामुळे अकोला जिल्ह्याच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

ई-भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता, सुविधा व सेवांचे भू-स्थानिक जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे एकत्रित डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव प्रकल्प आहे. या प्रणालीमध्ये शाळा, अंगणवाडी केंद्रे, रेशन दुकाने, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्रे, शासकीय कार्यालये तसेच विविध सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाला विकासकामांचे नियोजन, संसाधनांचे व्यवस्थापन, सेवा वितरण आणि निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पाने जिल्हा प्रशासनात डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना दिली असून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच नागरिकांना उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे.

या राष्ट्रीय सन्मानाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक चमूचे अभिनंदन केले असून हा पुरस्कार संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याचे सांगितले.

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! वसई होली फॅमिली शाळेत येशू चमत्कारांचे नाट्य!-अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर षड्यंत्र – जादूटोणा कायद्याने गुन्हा नोंदवा– हिंदु जनजागृती समितीची मागणी

पिकांची स्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी शेतात पीक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. 

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकार, प्रयत्नांमुळेरायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपलआयटी’ मंजूरटाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्ररायगडच्या रोहा एमआयडीसीत १०५ कोटी रुपये खर्चाची सीट्रिपलआयटी’ मंजूर, दरवर्षी हजारो युवकांना प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात, ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर…

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.