“शिवरायांच्या गडकोटांचा जागतिक सन्मान!”भाजपा महानगर जिल्ह्याच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा
राज्य प्रतिनिधी ‘आज जालना येथील भाजपा महानगर जिल्हा कार्यालयात एक ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षणाचा आनंद साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा गौरव गाथा सांगणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याची साक्ष देणारे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आले आहेत.
या यादीत राजगड (स्वराज्याची पहिली राजधानी), रायगड (दुसरी राजधानी), शिवनेरी (शिवजन्मभूमी), प्रतापगड, लोहगड, खांदेरी, पन्हाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत आज जालना येथे भाजपा महानगर जिल्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे भरून जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. उपस्थित कार्यकर्त्यांनी हा क्षण देशाच्या वैभवशाली इतिहासाच्या सन्मानाचा असल्याचे सांगितले
भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले व म्हटले की, “शिवछत्रपतींच्या गडकोटांचा जागतिक स्तरावर झालेला सन्मान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे. हे निर्णय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.